बाळासाहेब ठाकरे : व्यक्ती नव्हे, विचार.”
आज आपण केवळ एका नेत्याची जयंती साजरी करत नाही आहोत, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शंभर वर्षांचा इतिहास आणि भविष्याचा संकल्प साजरा करत आहोत; बाळासाहेब म्हणजे नाव नव्हे तर मराठी माणसाच्या छातीत पेटलेला स्वाभिमानाचा अग्नी, अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची निर्भीड हिंमत आणि सत्तेच्या बाहेर राहूनही सत्तेला हादरवणारी विचारशक्ती होती—ज्या काळात मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी गप्प बसायला शिकवला जात होता, त्या काळात बाळासाहेबांनी त्याला आवाज दिला, मान दिली आणि लढायला शिकवलं; त्यांनी कधी पदांची, सत्तेची लालसा धरली नाही, पण त्यांच्या एका वाक्याने संपूर्ण देशाचं राजकारण थांबायचं, कारण त्यांचा करिष्मा पदाचा नव्हता तर जनतेच्या विश्वासाचा होता; आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात आपण फक्त फुले वाहून किंवा फोटोला हार घालून थांबणार नाही, तर मराठी भाषा, मराठी माणूस, हिंदुत्व, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष हे त्यांनी दिलेले मूल्य आचरणात आणण्याचा संकल्प केला पाहिजे, कारण आजही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहत असताना बाळासाहेबांचे विचार आपल्याला आठवण करून देतात की डोकं झुकवणं हा पर्याय नाही आणि स्वतःच्या मातीत परका होणं हा गुन्हा आहे; बाळासाहेब अमर आहेत कारण ते पुतळ्यांत नाहीत तर प्रत्येक त्या मराठी माणसाच्या श्वासात आहेत जो आजही अभिमानाने म्हणतो—मी मराठी आहे, आणि म्हणूनच हे जन्मशताब्दी वर्ष केवळ उत्सव नसून विचारांनी, कृतीने आणि जागृतीने साजरं करण्याची हीच खरी मानवंदना आहे.
© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.
Comments
Post a Comment