Posts

Showing posts from January, 2026

महाराष्ट्राचा "दादा" हरपला!

Image
अजितदादा पवार यांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण कल्पनाच करता येत नाही. त्यांच्या नावासोबत केवळ पद नव्हे, तर निर्णयक्षमता, धाडस आणि ठाम नेतृत्व यांची ओळख जोडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांनी निर्माण केलेली जागा ही सहज भरून न निघणारी आहे. वक्तशीरपणा आणि कामाची धडाडी हे अजितदादांचे मोठे गुण होते. वेळेचं भान, कामातली शिस्त आणि निर्णयातील स्पष्टता त्यांच्या रोजच्या कामकाजातून कायम दिसून आली. कामाची आवड हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यामुळेच प्रशासन त्यांना गांभीर्याने घेत असे. राज्याच्या विकासात त्यांनी घेतलेली भूमिका ठळक आहे. अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त, निधीचं योग्य नियोजन आणि विकासकामांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पुणे–पिंपरी-चिंचवड परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा, नागरी प्रकल्प, तसेच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना त्यांनी दिलेला पाठिंबा हे त्यांच्या विकासदृष्टीचं उदाहरण आहे. ग्रामीण महाराष्ट्रासाठी सहकारी चळवळ, साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि शेतकरी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्...

प्रजासत्ताक दिन विशेष २०२६

Image
आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केवळ ध्वज फडकवणे, घोषणा देणे किंवा सोशल मीडियावर देशभक्तीचे स्टेटस टाकणे एवढ्यावरच राष्ट्रप्रेम संपत नाही; उलट आज आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपल्याला ज्या भारताचे स्वप्न दाखवले गेले होते घटनात्मक मूल्यांवर उभा असलेला, समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुतेवर विश्वास ठेवणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा भारत—तो देश नेमका कुठे हरवला, हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिकाने स्वतःला विचारायला हवा. विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार, संशोधन, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मूलभूत मुद्द्यांऐवजी देश आज हिंदू-मुसलमान, धर्म-जात या फाटाफुटीच्या राजकारणात अडकलेला दिसतो. लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहतात, न्यायालयांच्या निष्पक्षतेबाबत शंका व्यक्त केल्या जातात, आणि भ्रष्टाचाराचा भस्मासुर संपूर्ण व्यवस्थेला पोखरत असल्याचे चित्र वारंवार समोर येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विरोधी मतांचा सन्मान आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार हळूहळू संकुचित होत चालला आहे, ज्यामुळे देश हुकुमशाहीकडे झुकत असल्याची भीती वाटणे साहजिक...

बाळासाहेब ठाकरे : व्यक्ती नव्हे, विचार.”

Image
आज आपण केवळ एका नेत्याची जयंती साजरी करत नाही आहोत, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शंभर वर्षांचा इतिहास आणि भविष्याचा संकल्प साजरा करत आहोत; बाळासाहेब म्हणजे नाव नव्हे तर मराठी माणसाच्या छातीत पेटलेला स्वाभिमानाचा अग्नी, अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची निर्भीड हिंमत आणि सत्तेच्या बाहेर राहूनही सत्तेला हादरवणारी विचारशक्ती होती—ज्या काळात मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी गप्प बसायला शिकवला जात होता, त्या काळात बाळासाहेबांनी त्याला आवाज दिला, मान दिली आणि लढायला शिकवलं; त्यांनी कधी पदांची, सत्तेची लालसा धरली नाही, पण त्यांच्या एका वाक्याने संपूर्ण देशाचं राजकारण थांबायचं, कारण त्यांचा करिष्मा पदाचा नव्हता तर जनतेच्या विश्वासाचा होता; आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात आपण फक्त फुले वाहून किंवा फोटोला हार घालून थांबणार नाही, तर मराठी भाषा, मराठी माणूस, हिंदुत्व, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष हे त्यांनी दिलेले मूल्य आचरणात आणण्याचा संकल्प केला पाहिजे, कारण आजही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहत असताना बाळासाहेबांचे विचार आपल्याल...

2026 ची महानगरपालिका निवडणूक : मुंबईच्या अस्तित्वाची लढाई

Image
2026 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नाही. ही निवडणूक म्हणजे मुंबई कोणाच्या हातात राहणार, आणि उद्या हे शहर कोणत्या दिशेने जाणार, याचा थेट निर्णय आहे. मुंबई ही फक्त आर्थिक राजधानी नाही; ती मराठी माणसाच्या कष्टांवर, त्याच्या संघर्षावर आणि स्वप्नांवर उभी राहिलेली नगरी आहे. आज मात्र परिस्थिती वेगळी दिसते. मराठी माणूस आपल्या स्वतःच्या शहरात घरासाठी झगडतोय, नोकरीसाठी संघर्ष करतोय आणि अनेकदा दुय्यम असल्याची भावना अनुभवतोय. हे अचानक घडलेलं नाही. स्थानिक स्वराज्य कमजोर झालं की स्थानिक माणूस हळूहळू बाजूला पडतो, हा इतिहास आहे. महानगरपालिका म्हणजे केवळ एक प्रशासकीय संस्था नाही. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, घरबांधणी, झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्थानिक रोजगार — आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेले निर्णय इथे घेतले जातात. हे निर्णय जर मुंबईकरांच्या गरजांऐवजी दूर बसून ठरवले गेले, तर त्याचा फटका सामान्य माणसालाच बसतो. मुंबईची एक स्वतंत्र ओळख आहे. ही ओळख आहे मराठी भाषा, संस्कृती, सण-उत्सव, आणि स्वाभिमानाची. मुंबईने नेहमीच आपला आवाज उंच ठेवला आहे. जेव्हा-जेव...